उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन – वृद्ध वडिलांना त्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे उपचार सुरु असताना वडिलांचा मृत्यु झाला. पण वडिलांना गावात अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या भितीपोटी मुलगा वडिलांचा मृतदेह तसाच रुग्णालयात ठेवून निघून गेला. कोरोनाच्या भितीमुळे मुलाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाची दहशत सध्या सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी त्याची रक्ताचे नातेवाईकही पुढे येत नाही. महापालिकेच्या लोकांना तुम्हीच अत्यसंस्कार करण्यास सांगितले जात आहे. पण इथे वडिल निगेटिव्ह असतानाही हा प्रकार घडला आहे.
परंडा तालुक्यातील ७० वर्षाच्या व्यक्ती प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. तरीही गावी अंत्यसंस्काराला अडचणी येतील, असे समजून घाबरुन मृतदेह रुग्णालयात सोडून मुलाने गाव गाठले. हा प्रकार बुधवारी उघड झाला. त्यानंतर पालिका कर्मचार्यांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.