नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने आज १८ लाखांचा आकडा पार केला आहे. कोरोनाबद्दल तज्ञांच्या अंदाजापेक्षा कोरोनाची प्रकरणे आणखी वेगाने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाची जवळपास ५३ हजार नवीन प्रकरणे आढळली आहेत. नवीन प्रकरणे आढळल्यानंतर आतापर्यंत कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढून १८ लाख ३ हजार ६९५ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५२ हजार ९७२ रुग्ण वाढले आहेत, तर या दरम्यान ७७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी ५४,७३५ प्रकरणे आढळली होती आणि ८५३ लोकांचा मृत्यू झाला होता.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाची ५ लाख ७९ हजार ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत ३८ हजार १३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११ लाख ८६ हजार २०३ लोक बरे झाले आहेत आणि एक परदेशी परतला आहे. कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट ६५.४४% झाला आहे. कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे.
रविवारी महाराष्ट्रात कोरोनाची ९,५०९ नवीन प्रकरणे आढळल्यानंतर एकूण संक्रमितांची संख्या ४,४१,२२८ वर गेली. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत आणखी २६० रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात या महामारीमुळे आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या १५,५७६ झाली आहे. ते म्हणाले की, रविवारी एकूण ९,९२६ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे राज्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढून २,७६,८०९ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आता १,४८,५३७ रुग्ण उपचार घेत आहेत.
गुजरातमध्ये कोरोनाची १,१०१ प्रकरणे आढळली
गुजरातमध्ये कोरोनाची १,१०१ नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमितांची एकूण संख्या ६३,५७५ वर पोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की, २२ रुग्णांच्या मृत्यूसह मृतांची संख्या २,४८७ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे की, आज ८०५ रूग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले, त्यानंतर बरे झालेल्या लोकांची संख्या ४६,५८७ झाली आहे. विभागाने म्हटले की, राज्यात अद्याप १४,६०१ लोक उपचार घेत आहेत. रिकव्हरी रेट ७३.१६ टक्के आहे.
बिहारमध्ये २,७६२ नवीन प्रकरणे
रविवारी बिहारमध्ये कोरोनाची २,७६२ नवीन प्रकरणे आढळाल्यांनतर राज्यात संक्रमितांची एकूण संख्या ५७,२७० वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, या प्राणघातक विषाणूमुळे गेल्या २४ तासात आणखी १० रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या वाढून ३२२ झाली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच दिवसांत दररोज होणाऱ्या तपासणीची संख्या दुप्पट झाली आहे.
Single-day spike of 52,972 positive cases & 771 deaths in India in the last 24 hours.
India's COVID19 tally rises to 18,03,696 including 5,79,357active cases, 1,186,203 cured/discharged/migrated & 38,135 deaths: Health Ministry pic.twitter.com/OKfjsgwyC9
— ANI (@ANI) August 3, 2020
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आमदारासह १८१ लोक कोरोना पॉझिटिव्ह
छत्तीसगडमध्ये रविवारी कॉंग्रेस आमदारासह आणखी १८१ लोकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आणि संक्रमितांची एकूण संख्या ९,६०८ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात कोविड-१९ मुळे मृतांची संख्या ५८ वर गेली आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. रविवारी राज्यात ३८१ लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. काँग्रेस आमदार आणि भिलाई महानगरपालिकेचे महापौर देवेंद्र यादव यांनी ट्विट केले की, त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.