बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना (Corona ) ची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी अद्यापही हे संकट संपले नाही. ब्रेक द चेनमध्ये आपण जे निकष अन् 5 स्तर ठरवले आहेत. त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील केले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी रविवारी (दि. 6) विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका-यांना दिले आहेत. तसेच कोरोना (Corona) च्या तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या व सावध रहा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यभरात 4 जूनच्या आदेशानंतर निर्बंध शिथिल झाल्याचा समज निर्माण झाला होता.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त,
पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल झाले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असेही स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी तिस-या लाटेचा धोका कायम आहे.
ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेच्या वर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पाउले उचलतो, अगदी तसेच करोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या 5 पातळ्या ठरल्या आहेत.
मनात शंका असेल तर निर्बंध घाला
कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ-उतार होत असतात.
आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारावर निर्बंध घाला,
कुठल्याही दबावाला बळी पडू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,
निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनाना दिला आहे.
एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे अन् दुसरीकडे आपले आर्थिक,
सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे एवढ्याच करीता निर्बंधांच्या या पातळ्या ठरवल्या आहेत.
कोरोनामुक्त गावांची टक्केवारी गृहीत धरणार
मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे.
त्याला रोखण्यासाठी आपण कोरोनामुक्त गाव करा म्हणून आवाहन केले आहे.
या कोरोनामुक्त गावांची टक्केवारी देखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागेल.
गर्दी होता कामा नये
नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी , समारंभ, सोहळे चालणार नाहीत.
आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरु ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व बाबी त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवायचे आहे.
कृपया हे देखील वाचा:
वीर धरणाच्या परिसरात ‘पार्टी’ करत हवेत ‘गोळीबार’ ! बारामती, इंदापूर, पुरंदरमधील 9 तरूण ‘गोत्यात’, सातार्यासह पुणे जिल्हयात प्रचंड खळबळ
दुसर्यांदा पिता बनला ‘प्रिन्स हॅरी’, पत्नी ‘मेगन मर्केल’ने मुलीला दिला जन्म, ‘लिली डायना’ ठेवले नाव
पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)
दहावीच्या निकालासाठी 15 जुलैपर्यंत प्रतीक्षा ? आज किंवा उद्या आराखडा येईल समोर