बहुजननामा ऑनलाईन टीम – एखाद्या मुलीने लग्न होणार नाही हे माहित असून देखील शारीरिक संबंध ठेवले असेल आणि त्यानंतर जर ती व्यक्ती संबंधितांवर बलात्काराचा आरोप ठेवत असेल तर तो आरोप ग्राह्य धरला जाणार नाही. असे स्पष्टीकरण देत मध्य प्रदेश हायकोर्टाने बलात्काराचं प्रकरण फेटाळले आहे. आरोपीसोबत तक्रारदार तरुणी प्रेमात होती आणि तिच्या इच्छेनेच त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. आणि आता तक्रारदार तरुणी आपल्या म्हणण्यावरून माघार घेऊ शकत नाही. असे निरीक्षण कोर्टाने निकालात नोंदवले आहे.
‘लाईव्ह लॉच्या’ वृत्तानुसार, सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या जबाबाचाही कोर्टाने आधार घेतला आणि लग्नाला नकार दिल्यानंतरही जर दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवले का, याचा कोर्टाने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचे हे प्रकरण नाही असे समोर आले आहे. तक्रारदार युवती आरोपीच्या प्रेमात असल्याने हा सर्व प्रकार तिच्या सहमतीने झाल्याचा कोर्टाने स्पष्ट केला आहे. या निकालात हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेतला.
जर पुरुषाने दिलेल्या खोट्या आश्ववसनामुळे नव्हे, तर फिर्यादी महिला तिच्या इच्छेप्रमाणे शारीरिक संबंध ठेवू शकते. किंवा लग्न करण्याची इच्छा असताना वचन दिल्यानंतरही काही परिस्थितीमध्ये ते वाचन पूर्ण नाही केले गेले असेही प्रसंग येऊ शकतात. अशा अनेक प्रसांगाना त्या त्या पद्धतीने हाताळायला हवे. जर तेच पुरुषाने केवळ शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आश्वासन दिले असेल तेव्हा हा प्रकरण बलात्कार प्रकरण होईल. महिला आणि पुरुष यांच्यातील सहमतीने झालेले शारीरक संबंध कलाम ३७६ अंतर्गत बलात्कार असू शकत नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.