नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जयपूरमध्ये मंगळवारी काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी युवा आक्रोश रॅलीला संबोधित केले. राहुल गांधी यांच्या आधी अनेक कॉग्रेस नेत्यांनी देखील भाषण केले. यावेळी एका काँग्रेस युवा नेत्याने थेट पंतप्रधान मोदींवरच हल्ला बोल केला. तो म्हणाला, पंतप्रधान इतके खोटे बोलतात की खोटेपणा त्यांचा चेहरा पाहून दुसरीकडे निघून जात असेल.
रॅलीचे संचालन करणाऱ्या एका युवा काँग्रेस नेत्याने व्यासपीठावर म्हंटले की, खोटेपणावरून आठवले, आपले पंतप्रधान इतके खोटे बोलतात की उद्या जर चुकून खोटेपणा धर्तीवर अवतरला आणि मोदींसमोर चुकून गेला तर मी शपथ घेऊन सांगतो खोटेपणा मोदींना हात जोडेल आणि म्हणेल तुम्ही आधी जा कारण तुम्ही आम्हाला सिनिअर आहात. काँग्रेस पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी देखील पंतप्रधान आणि गृह मंत्री यांची नऊ खोटी विधाने सांगितली होती.
जयपूरच्या रॅलीमध्ये राहुल गांधींनी केला हल्लाबोल
राहुल गांधी यांनी बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून सरकारवर चांगलाच हल्ला बोल केला. एवढेच नाही तर पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा खराब केल्याचेही राहुल गांधी यांनी म्हंटले. सीएए बाबतच्या हिंसाचारावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, सध्या सरकार स्वतः हिंसा घडवून आणत आहे आणि एका धर्माला दुसऱ्या धर्मविरोधात लढवत आहे. तसेच यावेळी बोलताना केंद्र सरकारच्या जीएसटी,नोटबंदी आणि घसरणारा जीडीपी अशा अनेक धोरणांवर हल्लाबोल करण्यात आला.
Visit : bahujannama.com