मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपची महाजनादेश यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरु होणार आहे. महाजनादेश यात्रेला सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस २० ऑगस्टपासून पोलखोल यात्रा काढणार आहे. काँग्रेस महाजनादेश यात्रेला पोलखोल यात्रेच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री ज्या ठिकाणी जाऊन आलेत त्या ठिकाणी जाऊन भाषणात जे मुद्दे मांडले त्याची पोलखोल नाना पटोले करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी यात्रेची पहिली सुरवात मोजरीपासून केली होती. नाना पटोले देखील पोलखोल यात्रेची सुरुवात तिथून करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाषणात विकासाचे जे दावे केले ते किती खरे किती खोटे यासाठी ही पोलखोल यात्रा काढण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत विरोधकांना आव्हान दिले होते की, “त्यांनी चर्चा करावी राज्यात किती विकास झाला.” हे आव्हान नाना पटोले यांनी स्वीकारलं होतं. पण त्याला मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आता नाना पटोले राज्यात फिरणार आहेत. मुख्यमंत्री जिथे जाणार तिथे यात्रा काढत त्यांच्या भाषणातील मुद्द्यांची पडताळणी नाना पटोले करणार आहे.
काँग्रेसच्या पोलखोल यात्रेतून जनते समोर ते मांडणार आहेत की, मुख्यमंत्री नेहमी भाषण करताना आकड्यांमधून माहिती देतात, हा आकड्यांचा खेळ आहे, अशी टीका विरोधी पक्षाचे नेते करतात.