नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस वर कडवी टीका केली आहे. जम्मू काश्मीर मधून ३७० हे कलम रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे पाकिस्तान मधील संसदेत कौतुक होत आहे याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा पाकिस्तान सरकार संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या याचिकेत भारताविरोधात वापर करत आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. याची काँग्रेसच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे.
कांग्रेस ने अनुच्छेद 370 को हटाने का विरोध किया।
राहुल गांधी के बयान की पाकिस्तान की संसद में प्रशंसा होती है। उनके बयान को पाकिस्तान अपनी यूएन में दाखिल याचिका में शामिल करता है।
कांग्रेसियों को शर्म आनी चाहिए कि उनके बयान का उपयोग भारत के खिलाफ हो रहा है: श्री अमित शाह pic.twitter.com/cFYnE32b51
— BJP (@BJP4India) September 1, 2019
गृहमंत्री शहा शनिवारी दादरा नगर हवेली मध्ये बोलताना म्हणाले की, काश्मीर मधून ३७० हटवल्याचा काँग्रेस विरोध करत आहे. आजही राहुल गांधी जे वक्तव्य करतात त्याचे पाकिस्तान मध्ये कौतुक केले जात आहे. गांधी यांच्या वक्तव्याचा भारताच्या विरोधात वापर केला जात आहे. याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे.
कांग्रेस ने 370 को हटाने का विरोध किया। आज भी राहुल गांधी जो बयान देते हैं उसकी पाकिस्तान में तारीफ होती है। उनके बयान को पाकिस्तान अपनी याचिका में शामिल करता है।
कांग्रेसियों को शर्म आनी चाहिए कि उनके बयान का उपयोग भारत के खिलाफ हो रहा है: गृहमंत्री @AmitShah pic.twitter.com/icDQE5oorw
— BJP (@BJP4India) September 1, 2019
संबंध देश निर्णयाचे कौतुक करतोय
शहा पुढे म्हणाले कलम ३७० आणि ३५-ए हे देशाच्या एकीकरणात मोठा अडथळा होता. हे कलम रद्द करण्याचे धाडस केवळ प्रधानमंत्री मोदी यांच्यामध्ये आहे.
मागच्या ७० वर्षात अनेक पक्षांची सरकारे येऊन गेली. काही लोकांच्या तीन – तीन पिढ्यांनी देशावर राज्य केले. परंतु ३७० कलम रद्द कोणीही करू शकले नाही.
जे काम कोणी इतर करू शकले नाहीत. ते काम मोदी यांनी संसदेच्या पहिल्या सत्रात ३७० हे कलम रद्द करून दाखवून दिले.
काश्मीरच्या विकासाला चालना मिळणार
शहा म्हणाले की , हे कलम रद्द झाल्यामुळे जम्मू काश्मीर च्या विकासाला चालना मिळणार आहे. काश्मीरमधून दहशतवाद नष्ट होणार आहे. जम्मू काश्मीरला पूर्णपणे भारताशी जोडण्याचे काम झाले आहे. सरकारच्या या निर्णयावर सर्व जनता खुश आहे. केवळ काही विरोधक हे विरोध करत आहेत.