भोकर:- (माधव मेकेवाड) – मतदारसंघात प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जनता मोठया विश्वासाने आमदार निवडून देऊन त्यांच्या विश्वासार्ह विकासात्मक गोष्टीची वाट पाहते पण त्या मतदारसंघात प्रलंबित असलेले प्रश्न कुठलेच सुटले नसल्याने आमदार अमिता चव्हाण यांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्ष विविध मागण्या घेऊन रस्त्यावर उतरत आहे.पण भोकर मधील सर्व विकास थांबण्याच काम भाजप सरकार मुद्दामून करत आहे असा आरोप काँग्रेस पार्टी करत आहे त्यामुळे उपविभागीय अधिकार्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
अशोक चव्हाण यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या आमदार अमिता चव्हाण यांच्याच मतदार संघात भोकर येथिल उपविभागीय कार्यलसमोर काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.शेतकरी व भोकर शहर विकासाच्या,बँकेच्या प्रमुख अनेक मागण्या घेऊन धरणे आंदोलन होत असल्याने ह्या आंदोलनास चांगला प्रतिसाद शेतकरी वर्गाकडून व भोकर वासीयाकडून मिळाला आहे. या मध्ये अनेक जण आपलं म्हणणं मांडताना म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे अशोक चव्हाण यांचा जुना मतदारसंघ व आमदार अमिता चव्हाण यांचा चालू मतदार संघ असल्याने भोकरकडे मुदामून पाठपिरवली असल्याचे त्यांनी त्या वेळी बोले.या वेळी भोकर काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष तथा मार्केट कमिटी सभापती जगदीश पाभोसीकर,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाभोसीकर, मंगराणी अंबुलगेकर,बाळासाहेब रावण गावकर,विनोद चिंचाळकर (माजी नगराध्यक्ष),रामचंद्र मुसळे(संचालक) इतर अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
भाजप सरकार वर नाराज असलेलं शेतकरी मात्र त्यांना पीक विमा,पीक कर्ज मिळावे म्हणून एक आशा सरकार वर ठेवली आहे पण सरकार हे काम करत नसल्याने शेतकरी चक्क अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अमिता चव्हाण यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या धरणे आंदोलन मध्ये सहभागी झाले आहेत.चक्क विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी नेतृत्व करून ठेवलेले धरणे आंदोलन संपूर्ण राज्यभर गाजनार आहे ह्या मुळे शेतकऱ्यांच्या ह्या मागण्या रास्त आहेत ते भाजप सरकारने पूर्ण कराव्या ह्या साठी एकवटले आहेत जर मागण्या मान्य नाही झाल्यास संपूर्ण शेतकरी वर्ग आगळ वेगळं आंदोलन करणार अशी चर्चा ह्या वेळी ह्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी होत होती. शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, भोकर ची SBI बँक विस्तारित करून त्या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी वाढवणे, श्रावणबाळ व निराधार लोकांच्या जाचक अटी कमी करणे, शेतकऱ्यांचे वीज बिल कमी करणे व त्यांना 24 तास वीजपुरवठा करणे ,महावितरण आपल्या दारी या योजनेत 2011-2014 मधील कोटेशन भरलेल्याना वीज जोडणी देणे, वनविभागाच्या जमिनी शेतकऱ्याच्या ताब्यात अनेक वर्षांपासून आहेत ते कायदेशीर करून देणे, भोकर फाटा ते राहाटी रोड तात्काळ काम चालु करणे, महामंडळ बी बियाणे शेतकऱ्याना उपलब्ध करून देणे,भोकर शहरात रेल्वे उडाण पुलाचे काम तात्काळ सुरु करणे अशा अनेक मागण्या घेऊन भोकर तालुक्याचे प्रलंबित प्रश्न घेऊन धरणे आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यलय येथे सुरू आहे.