मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ६ जागा देण्यास काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस तयार असून प्रकाश आंबेडकर मात्र १२ जागांसाठी आग्रही आहेत अशी माहिती सूत्रांमार्फत समोर आली आहे.
आगामी निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी व्हावी यासाठी काल ( २९ जानेवारी ) प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसकडून अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीची झालेल्या या बैठकीत ४८ पैकी १२ जागांची मागणी केली. विशेष म्हणजे या मागणी मध्ये सोलापूर लोकसभेची जागाही त्यांनी मागितली आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या मागणीला काँग्रेसने आक्षेप घेत नकार दिला होता. इतकेच नव्हे तर, सोलापूर लोकसभेची जागा देण्यास काँग्रेसचा विरोधही करण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनीच आता निरोप द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने जाहीर केली होती.
दरम्यान आंबेडकरांशी चर्चा सुरु आहे, आम्ही आशावादी आहोत. त्यांनी लेखी प्रस्ताव मागितला तो त्यांना दिला. अजूनही आमची चर्चा सुरु आहे. चर्चेतून मार्ग निघेल असे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटले होते.
विशेष म्हणजे, मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ६ जागा देण्यास तयार असल्याचे समोर आले आहे.
मात्र भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत १२ जागांसाठी आग्रह धरला आहे. इतकेच नव्हे तर, काल झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना आम्ही १२ जागांच्या मागणीवर ठाम आहोत. त्यापेक्षा कमी जागा आम्ही घेणार नाही. एमआयएमशी युतीबाबत कारण नाही. कारण एमआयएम आता जागा लढणार नाही. असे त्यांनी म्हंटले होते.