मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने पक्षात मोठी मेगा भरती केली होती. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येन भाजपमध्ये दाखल झाले होत. या भरतीवरून भाजपावर मोठी टीकाही झाली होती. बेरोजगारांची मेगाभरती बाजूला ठेवून केवळ सत्तेसाठी पैशाच्या बळावर भाजपाने ही मेगा भरती केली, अशी टीका झाली होती. दरम्यान, ही मेगा भरती ही भाजपाची मेगा चूक होती असे म्हणत स्वत: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चुकीची कबुली दिल्याने विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, भाजपाने विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरून सत्तेसाठी मेगाभरती केली होती. मात्र आता त्याच भाजपाला मेगा भरती ही चूक असल्याचे वाटत आहे. तसेच, गुंड व भ्रष्टाचारी लोकांना जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भाजपाने आता तरी सुधरावे. भाजपात गेलेले न घरके न घाट के झाले असून काँग्रेसचे मात्र त्यामुळे शुध्दीकरण झाले, असा टोला सावंत यांनी गयारामांना लगावला आहे.
आकुर्डीत भाजपाच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपात मेगा भरती ही मेगा चूक होती, अशी कबुली दिली होती. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरूनच भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपाला सुचलेली ही उपरती असल्याचे सावंत यांनी म्हटले.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा