मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. पण आता सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांवर टीका केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शिवसेनेच्या सामनामध्ये काय लिहिले आहे, ते बघून सामनाचा सामना पुढे कसा करायचा हे योग्य प्रकार ठरवू. भाजपचे आशिष शेलार सांगायचे जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी परिवार टीका केली. 70 वर्षांत काँग्रेसने काय केले, काँग्रेसने देश निर्माण केला आहे पण आता पंतप्रधान मोदी स्वत:चे घर उभे करत आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
तसेच लोकांना वाचवण्यापेक्षा लोकांना संपवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारने लशीबाबत खोटी माहिती न्यायालयात सादर केली आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
काय म्हटलंय सामनात?
‘महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न केला.