मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केल्यानंतर काही दिवसांनी भारतात लॉकडाउन जाहीर केला. यादरम्यान देशात विमानांचे उड्डाण सुरू होते. त्यामुळे लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी किती प्रवासी आले असावेत? त्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याऐवजी होम क्वारंटाइन करण्यात आले.. मात्रा त्यांनी कोरोनाचा प्रसार अधिक केला, असे मत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले असून या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य सरकार कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चाचणी करत आहे. टेस्टिंग किट्ससाठीही केंद्र सरकारकडून मदत मिळत नाही. तरीही आम्ही सर्वाधिक चाचण्या करत आहोत आणि त्यामुळेच रुग्णांची सर्वाधिक संख्या सापडत आहे. कोणत्याही शहरापेक्षा मुंबईत आरोग्य व्यवस्था उत्तम आहे. राज्य सरकार ज्या परिस्थितीत या सर्वांना सामोरे जात आहे. मुंबईतील धारावी ही जगातील सर्वात जास्त घनता असलेली वस्ती आहे. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच पालन करणे शक्य नाही. त्या ठिकाणी केवळ लोकांची चाचणी करणे हाच एक उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आतापर्यंत किती ट्रेन पाठवल्या हे सांगण्यापेक्षा सर्व रेल्वेगाड्या सुरू कराव्यात. रेल्वेगाड्या भरतील किंवा नाही परंतु कोरोना संकटापूर्वी जेवढ्या प्रमाणात रेल्वेगाड्या जात होत्या तेवढ्या त्यांनी सोडाव्यात. केंद्रीय मंत्र्याला एकमेकांवर आरोप करणे शोभत नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.