मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आपल्या वक्तव्यांमुळे आणि ट्विट मुळे नेहमी चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बरेच चर्चेत आले होते. पण त्यावर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीं कडक इशारा दिला आहे. इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला असे वक्तव्य बीड येथे झलेल्या एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावरून आता दाद निर्माण झाला आहे.
अशोक चव्हाणांनी बजावलं
जितेंद्र आव्हाड यांच्या वाक्तव्यानंतर अशोक चव्हाण यांनी ट्विट करून म्हंटले आहे की,’ देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिरा गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाडांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल’ असं त्यांनी बजावलं आहे.
देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. @Awhadspeaks यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 29, 2020
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड
बीडच्या संविधान बचाव कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की,’तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला’. मात्र आव्हाडांवर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वा बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.
त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ. पास हि पोहचू शकत नाही pic.twitter.com/X97RZK9J9o— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 29, 2020
आव्हाडांची सारवासारव
त्यानंतर आव्हाडांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करत इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणीबाणी बद्दल मत मतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजीची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळपास ही पोहचू शकत नाही असं सांगत मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे असं स्पष्टीकरण दिलं.
Visit : bahujannama.com