नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक गौप्य्स्फोट केला आहे. महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार कसे चालणार ?, असा प्रश्न करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला विरोध केला होता, परंतु आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. महाराष्ट्रात मुस्लिम बांधवांच्या आग्रहाखातर काँग्रेसने शिवसेनेसह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असेही चव्हाण म्हणाले आहेत.
हे विधान केल्यानंतर राज्यात भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. नंतर चव्हाण यांना त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अशोक चव्हाण यांनी पुन्हा तीन पक्षाच्या सरकार बनवण्याच्या संबंधित गौप्यस्फोट केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये अडथळे येऊ शकतात. जसे सरकार सत्तेत आले आहे, तसे काँग्रेस-राष्ट्रवादी मधील नेत्यांकडून वादग्रस्त विधान करणे सुरूच आहे. तसेच शिवसेनेकडून घटनाबाह्य काम करणार नसल्याचे लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे म्हणत त्यांनी इशारा दिला.
आमचे तीन पक्ष एकत्र येतील असे वाटले नव्हते, पण तरीही आम्ही एकत्र आलो. सध्या मल्टीस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. तीन विचारांच्या पक्षांचे सरकार चालणार कसे, या प्रश्नावर आम्ही घटनेच्या आधारावर आपले सरकार चालले पाहिजे, असे आम्ही म्हणतो. ही आमची भूमिका आहे. तसेच हे सरकार संविधानानुसार चालले नाही, तर सरकार मधून बाहेर पडण्याचे आदेशही सोनिया गांधी यांनी दिले असून याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री घटनेच्या बाहेर जाणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळेच आमचे सरकार व्यवस्थित सुरु आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
Visit : bahujannama.com