मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात आज महाविकासआघाडीचं नवं सरकार स्थापन होणार असून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षालाही मंत्रपद मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या नव्या ससरकारमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना संधी मिळू शकते अशी माहिती समोर येत होती. मात्र कुलाबा येथील आदर्श गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्यामागे पुन्हा एकदा ईडीची चौकशी लागणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री असतानाच आदर्श गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता त्यांच्यावर ईडीकडून पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्या सुरु होणार असे दिसते आहे. ईडीने बुधवारपासून पुन्हा एकदा आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरु केली आहे. आदर्श गृहनिर्माण सोसायटीत काल ईडीचे अधिकारी पुन्हा एकदा दाखल झाले होते. त्यांनी त्यातील घरांची मोजणी देखील केली. परंतू यावर कोणत्याही अधिकाऱ्यांने प्रतिक्रिया देणे टाळले.
ही सोसायटी कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बांधली जात असताना तेथील ४० फ्लॅट सर्वसामान्य नागरिकांना देण्यासही महसूलमंत्री असताना त्यांनी परवानगी दिली होती . तसेच मुख्यमंत्री असताना तीन नातेवाईकांना आदर्श सोसायटीत सदनिका दिल्याचे समोर आल्याने नोव्हेंबर २०१० साली अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, असा आरोप सीबीआयच्या आरोपपत्रात लावण्यात आला होता. तत्कालीन राज्यपाल के शंकरनारायण यांनी सीबीआयला अशोक चव्हाणांच्या विरोधात चौकशी करण्याची परवानगी दिली होती. राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येत नसल्याने चव्हाण यांचे नाव या प्रकरणातून वगळण्याची विनंती सीबीआयने केली होती. परंतू सीबीआयचा हा अर्ज आधी सीबीआय न्यायालयाने आणि नंतर उच्च न्यायालयाने फेटळला होता.
Visit : bahujannama.com