लातूर : बहुजननामा ऑनलाइन – भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा बरोबरच काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. काँग्रेसची महाराष्ट्रात अजिबात ताकद राहिलेली नाही. काँग्रेस आता राष्ट्रीय पक्ष नव्हे, तर गल्लीबोळातला झालाय अशी टीका भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केली आहे.
लातूर येथे भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला, दरम्यान मुंबई, ठाणे आणि पुण्यात काँग्रेसकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारही नाहीत. काँग्रेस भाजपा आणि आरएसएसला मागे टाकू शकत नाही. काँग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत. रॉबर्ट वड्रा, चिदंबरम हे भ्रष्टाचारात गुरफटलेले आहेत. अशोक चव्हाणही त्याच प्रकारातील नेते आहेत. काँग्रेसने मुकाट्याने आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेस कोणत्याही अटी आणि शर्थी ठेवण्याच्या स्थितीत नाही. काँग्रेसची महाराष्ट्रात अजिबात ताकद राहिलेली नाही. काँग्रेस आता राष्ट्रीय पक्ष नव्हे, तर गल्लीबोळातला झालाय. असे भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे, आम्ही काँग्रेसकडे जागा मागितलेल्या नाहीत. काँग्रेसकडे लातूरमध्ये उमेदवार नाहीत. नाहीतरी ज्या ठिकाणी तीन वेळा पराभव झाला आहे. अश्या १२ जागा द्या असे आम्ही त्यांना म्हंटलो आहोत. मात्र काँग्रेसने अजूनही उत्तर दिले नाही. असेही त्यांनी म्हंटले.