बहुजननामा ऑनलाइन टीम : नागरिकत्व विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेनेने मतदानापासून तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ शकली असती. शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 सदस्यांनी मतदान केले. मात्र विधेयकावर शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे कॉंग्रेस नाराज असल्याचे समोर आले आहे. शिवसेना विधेयकांच्या मंजूरीसाठी मतदान करणार नाही असे सांगण्यात आले होते. मग बाजूने मतदान का केले हे माहित नाही असे कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयकावेळी शिवसेनेच्या खासदारांनी मोदी सरकारला साथ देत विधेयकाच्या बाजूने मतदान केले. सोमवारी उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. समाजात फूट पाडण्यासाठी नागरिकत्व विधेयक आणले गेले आहे. बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक महत्वाचे प्रश्न देशासमोर आहेत. या मुद्द्यांवर मार्ग काढण्यापेक्षा समाजात तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप हुसेन दलवाईंनी केला आहे. विधेयक संविधानाला धरुन नाही. भाजपा राज्यघटना मानत नाही. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, ‘आम्ही राष्ट्रहिताच्या दृष्टीने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम ही महाराष्ट्रात लागू आहे.
जनहितासाठी राज्यात सत्तांतर झाले आहे. जनतेच्या विकासासाठी हा कार्यक्रम घेतला आहे.’ सामना अग्रलेखातून शिवसेनेने या विधेयकाविरोधात भाष्य केले होते. घुसखोरांना हाकला. नव्हे हायलायलाच हवे, पण त्या बदल्यात इतर धर्मीय-त्यांत हिंदू बांधव आहे. त्यांनी स्वीकारण्याचे राजकारण देशात धर्मयुद्धाची नवी ठिणगी तर टाकणार नाही ना? हिंदूंना जगाच्या पाठीवर हिंदूस्थानशिवाय दुसरा देश नाही हे मान्य, पण नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘व्होट बँके’चे नवे राजकारण यातून कोणी घडवू पाहत असेल तर ते देशाच्या हिताचे नाही अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने टीका केली होती.
Visit : bahujannama.com