नाशिक : बहुजननामा आनलाईन – शेतक-यांच्या पीकाचा विमा उतरवणा-या मोठमोठ्या विमा कंपन्या असताना केवळ शेतक-याप्रती कळवळा दाखवण्यासाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काढलेला मोर्चा चेष्टेचा विषय ठरला आहे. खासगी विमा कंपन्यांना इशारा देत राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा कळवळा दाखवणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढून १५ दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास पेकाटात लाथ घालण्याचा इशारा दिला आहे.
पीक विमा योजनेतील खरिपाच्या हंगामातील नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. शिवसेनेने मोर्चा काढलेली कंपनी फक्त रब्बी हंगामासाठी असल्याचे पुढे आल्याने शिवसेना पक्षप्रमुखांचा इशारा हा केवळ कळवळा असल्याचे समोर आले आहे. परभणीसह सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारींचे निवेदन उद्धव ठाकरेंनी विमा कंपनीला दिले आहे. मात्र, परभणीच नव्हे, तर राज्यातील शेतकऱ्यांच्या बहुतांश तक्रारी या खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रीमियम भरूनही त्यांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या खासगी कंपन्यांविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिलायन्स, आयसीआयसीआयए एचडीएफसीविरोधात राज्यभरात रोषराज्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान खरीप हंगामातील विमा कंपन्यांनी केलेले आहे. यामध्ये रिलायन्स इन्शुरन्स, आयसीआयसीआय लुम्बार्ड आणि एचडीएफसी अॅग्रो या कंपन्यांचा समावेश असताना शिवसेनेने रब्बी हंगामातील अत्यल्प तक्रारी असलेल्या भारती एक्सावर काढलेला मोर्चा फारच हास्यास्पद आहे. आम्ही गेल्या वर्षापासून या सर्व विमा कंपन्यांविरोधात ईर्डाकडे केलेल्या तक्रारींवर कंपन्यांची चौकशी करण्याऐवजी शिवसेनेने मोर्चाचा फक्त देखावा उभा केल्याचे समोर येत आहे.