नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – नाशिकमध्ये काल कौटुंबिक वादातून एका महिलेनं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण उपचारादरम्यान आज या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलगी आणि आईमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला होता. हरजितकौर संधू (वय ४५) असं या महिलेचं नाव आहे.
मुलगी सासरी ही नांदत नसल्यानं आणि माहेरीही येत नसल्यानं संतापाच्या भरात आईनं स्वतःला पेटवून घेतल्याचे म्हटले जात आहे. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आई-वडिलांविरोधातच तक्रार करण्यासाठी मुलगी पोलीस स्टेशनमध्ये पोहचली होती. यावर संतापलेल्या आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं होतं. ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गेटवर घडली.
या महिलेला लगेचच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र महिला ७५ टक्के जळाल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू ही घटना समोर आल्यानंतर पंचवटी परिसरात एकाच खळबळ उडाली. मुलगी नांदत नसल्याने संतापाच्या भरात आईने हे पाऊल उचलले आहे असे म्हंटले जात आहे.