नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आता खोऱ्यातील परिस्थिती हळूहळू सामान्य होताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरी शिष्ठमंडळाला विश्वास दिला आहे की, आगामी दोन आठवड्यात मोबाईल आणि इंटरनेट सेवा खोऱ्यात पूर्ववत होईल. इतकेच नाही तर आता केंद्र सरकारने अशी घोषणा केली आहे की, तेथील पंच आणि सरपंचांना आता 2-2 लाखांचा विमा दिला जाणार आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी काश्मीरच्या 22 गावांतील पंच आणि सरपंचांची भेट घेतली. हे तेच लोक आहेत ज्यांना आतंकवाद्यांनी वारंवार धमक्या देऊनही ते निवडणूक लढले. या बैठीकीत गृह मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
Delhi: Home Minister Amit Shah, MoS Home Nityanand Rai, Union Minister Jitendra Singh, Home Secretary AK Bhalla, Additional Secretary Gyanesh Kumar, meet village heads from Jammu & Kashmir, at Ministry of Home Affairs. pic.twitter.com/zZgFFUnch1
— ANI (@ANI) September 3, 2019
अशातच महाराष्ट्र सरकारनेही घोषणा केली आहे की, ते जम्मू काश्मीरमध्ये 2 कोटींची गुंतवणूक करेल. यानुसार लेह आणि पहलगाम मध्ये जमीन खेरदी केली जाईल जिथे रिसॉर्ट बनवलं जाईल.