मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुमत मिळालेल्या युती सरकारमध्ये सत्तेसाठी चढाओढ सुरु आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा हट्ट भाजपची डोकेदुखी बनली होती. मात्र आता सत्तास्थापनेसाठी शिवसेना सोबत आली तर देवेंद्र फडणवीस नेतृत्वात युती सरकारचा किंवा सोबत न आल्यास केवळ भाजप सरकार शपथविधी घेणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि इतर १६ खाती असा प्रस्ताव भाजपने दिला होते, मात्र भाजपचा हा प्रस्ताव शिवसेनेने धुडकुन लावला. तरी शिवसेनेला दिलेल्या प्रस्तावासंदर्भात अखेरपर्यंत वाट पाहू. तरी शिवनेने मान्य नाही केले तर २०१४ प्रमाणे यंदाही केवळ भाजप मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे समजते.
दरम्यान राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल. सध्याच्या सरकारला निर्णय घेताना काही बंधने आहेत. तरीही, नियमांच्या अधीन राहून आम्ही काम करीत आहोत. महाराष्ट्राचे हित लक्षात घेता सत्तास्थापनेचा तिढा सोडवून, लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले.