मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात पॉझिटिव्ही रेट अन् ऑक्सिजन बेड्सची संख्या लक्षात घेत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन Lockdown हटवला जात आहे. पण अनलॉकच्या Unlock या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली आदी 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरवल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा. जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा अन् घाईघाईने व्यवहार खुले करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. cm uddhav thackeray maharashtra corona lockdown cm uddhav thackeray warned do not unlock in hurry 7 districts on alert
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 0.15 इतका कमी झाला आहे.
मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली आदी जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट असल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.
राज्यातील या 7 जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक बनू शकते.
त्यामुळे या ठिकाणी चाचणी, ट्रेसिंग आणि लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.
या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल.
प्रसंगी अधिक कठोर निर्बंधही लावावे लागणार असल्याचे कोविड टास्क फोर्सचे डॉ संजय ओक आणि
डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे.
Web Titel : cm uddhav thackeray maharashtra corona lockdown cm uddhav thackeray warned do not unlock in hurry 7 districts on alert
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update