धनगर समाजाचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रासपच्या मेळाव्यातच आरक्षणाची घोषणा केली जाऊ शकते, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. धनगर आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. ‘धनगर आरक्षणाचा अहवाल तयार झालेला आहे. ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहे त्या पध्दतीचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात काही बाबींची पूर्तता करायची आहे. त्याची पूर्तता करून आम्ही धनगर आरक्षणाची शिफारस करू,’ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.
‘आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाईल. यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी मी विनंती करतो,’ असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनगर आरक्षणाबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं.
धनगर समाजाचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रासपच्या मेळाव्यातच आरक्षणाची घोषणा केली जाऊ शकते, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. धनगर आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. ‘धनगर आरक्षणाचा अहवाल तयार झालेला आहे. ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहे त्या पध्दतीचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात काही बाबींची पूर्तता करायची आहे. त्याची पूर्तता करून आम्ही धनगर आरक्षणाची शिफारस करू,’ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.
‘आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाईल. यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी मी विनंती करतो,’ असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनगर आरक्षणाबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं.