नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CM Eknath Shinde | राजीनामे द्या आणि निवडणुका लढा, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले होते. ते शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या आव्हानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यघटनेप्रमाणेच निवडणुका होतील, शिवसेना-भाजप युतीचे हे मजबूत सरकार आहे. एकीकडे 164 आमदारांचे मजबूत सरकार आणि समोर 99 आहेत, असे शिंदे यांनी म्हणत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षावर हक्क सांगितला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा करत आहेत. दरम्यान, आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना त्यांना राजीनामे द्या आणि पुन्हा निवडणुका लढा असे आव्हान दिले होते. (CM Eknath Shinde)
उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यघटनेप्रमाणेच निवडणुका होतील, शिवसेना-भाजप युतीचे हे मजबूत सरकार आहे. एकीकडे 164 आमदारांचे मजबूत सरकार आणि समोर 99 आहेत. 164 बहुमताचं हे सरकार आहे. त्यामुळे, लोकांनी त्यांची कामे आणि समस्या घेऊन आमच्याकडे यावे. आम्ही लोकांच्या हिताची काम करण्यासाठीच हे सरकार स्थापन केले आहे, ते आम्ही करत राहू.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत धनुष्यबाण आमचाच आहे.
तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे शिंदे गटाला ठणकावून सांगितले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले होते, मी आजही म्हणतो हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. मध्यावधी निवडणूक व्हायला हवी.
मी चुकलो असेल तर जनता मला घरी बसवेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- CM Eknath Shinde | CM eknath shinde take re election eknath shindes response to uddhav thackerays challenge
हे देखील वाचा :
Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेना सोडून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे सांगून टाका’
Bachchu Kadu On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, पण… – बच्चू कडू
Pune Crime | आई-वडील शाळेत मीटिंगसाठी गेले; मुलीची 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या