बहुजननामा ऑनलाईन : भाजपची महाजनादेश यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरु होणार आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा २१ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ही यात्रा ३१ ऑगस्टपर्यंत राज्यात १,८३९ किमी प्रवास करणार आहे. २१ ऑगस्टला यात्रा सुरु होणार त्यानंतर ३१ ऑगस्टला या यात्रेचा शेवट होणार. या यात्रेची सुरुवात नंदुरबार येथून होणार आहे तर समारोप ३१ ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे.
पूरपरिस्थितीमुळे जनादेश यात्रा पाच दिवस उशिरा नंदुरबार येथून यात्रा सुरू होणार. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्हे आणि ५५ मतदारसंघ आहेत. यामध्ये ३९ जाहीर सभा होणार आहेत तर ५० स्वागत सभा होणार आहेत. हि यात्रा दुसऱ्या टप्प्यात १८३९ किमी प्रवास करणार आहे. दुसऱ्या टप्प्याचा शेवट सोलापूर इथे ३१ ऑगस्टला होणार आहे. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेश उत्सव संपल्यानंतर सुरु होणार आहे. याची माहिती भाजप नेते आणि महाजनादेश यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.
सांगली, कोल्हापूर येथील पूर परिस्थितीमुळे 3 दिवस आधीच पहिला टप्पा बंद झाला होता. पूरग्रस्त भाग असलेले पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे महाजनादेश यात्रेतून वगळले होते. यात्रेतील सर्व निवास व्यवस्था एकाच जागी करण्यात आली आहे. मार्गावरील सर्व गावात स्वागत आयोजित करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री रथावरूनचं स्वागत स्विकारतील. यात्रेत तीन हजारांपेक्षा अधिक नागरिक आले तर रथावरूनचं मुख्यमंत्री लोकांना मार्गदर्शन करतील, अशी माहितीही ठाकूर यांनी दिली.