नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्र्यांची महाजनदेश यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीबद्दल पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवरही हल्लाबोल केला आहे. तसेच सद्य परिस्थितीवरून भविष्यात विरोधीपक्षनेतेपद हे वंचित बहुजन आघाडीकडे असेल, असे वक्त्यव्य मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.
म्हुख्यमंत्री म्हणाले कि, नारायण राणे हे भाजपचेच खासदार असून ते भाजपमध्येच आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्ष विलीनीकरणासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भात राणेंसोबत चर्चा केली जाईल. त्यामुळे भविष्यात विरोधी पक्षपद वंचित बहुजन आघाडीकडे असेल नाकी काँग्रेसकडे, आणि राष्ट्रवादी पक्ष हा फक्त राज्यापुरताच मर्यादित असणार आहे.
तसेच मराठवाड्याची दुष्काळी परिस्थिती पाहता तेथे वॉटर ग्रीड सारखे महत्वकांक्षी प्रकल्प गरजेचे आहेत. त्यामुळे १०२ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळवून देणार आहे. कोकणातील वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी लिफ्ट द्वारे मराठवाड्यात वळविण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाडा दुष्काळमुक्त होण्यास मदत होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर देखील जोरदार टीका केली आहे. अशोकाच्या झाडाची फक्त उंची वाढत असते , त्याची सावली मात्र कुणालाच मिळत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नांदेडकरांनी भाजपच्या बाजूने कौल देत नवीन सावली शोधून इतिहास घडविला आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी