नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हिंसाचार प्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसेत जखमी झालेल्या लोकांना फ्रीमध्ये उपचार दिले जातील, असे म्हटले आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्ली सरकार मृतांच्या कुटुंबियांना १०-१० लाख रुपये देणार असून गंभीर स्वरूपात जखमी झालेल्यांना २ लाख रुपये दिले जातील, असे ते म्हणाले.
केजरीवाल यांनी नुकसान भरपाईची घोषणा करत दिव्यांग झालेल्यांना ५ लाख, ज्यांचे घर जळाले त्यांना ५ लाख आणि अल्पवयीन मृतांच्या कुटुंबांला ५ लाख नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्यांनी रिक्षाचे नुकसान झालेल्यांना २५ हजार तर अनाथ झालेल्या मुलांना ३ लाख रु. देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी दिल्लीच्या या परिस्थितीवर राजकारण करू नये, असे म्हटले आहे. दोषी असलेल्यांना कडक शिक्षा देणार असून ते माझ्या पक्षातले जरी असले तरी चालतील, असेही ते म्हणाले.
Delhi CM Arvind Kejriwal: Any person who is found guilty should be given stringent punishment. If any Aam Aadmi Party person is found guilty then that person should be given double the punishment. There should be no politics on the issue of national security. #DelhiViolence pic.twitter.com/ykrsL7sIA4
— ANI (@ANI) February 27, 2020
१३ एप्रिलला होणार पुढची सुनावणी
दिल्ली हिंसाचार प्रकरणात गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. हायकोर्टाने दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारला भडकाऊ विधान केल्यामुळे दाखल याचिकेवर सविस्तर उत्तर दाखल करण्यास सांगितले. चार आठवड्यात गृह मंत्रालयाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले असून याप्रकरणी पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे.