नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान खोऱ्यामध्ये सीमा वादावरून भारत चीन या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याच वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताला हानी पोहचवण्याचा नवा कट केला आहे. भारतातील फार्मा क्षेत्र पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. भारतीय औषध कंपन्या चीनकडून गरजेच्या 70 टक्के एपीआय चीनकडून आयात करतं. भारत चीनवर अनेक बाबींसाठी अवलंबून आहे. दोन्ही देशांतील तणाव वाढल्यानंतर चीनकडून आता याचा गैरफायदा घेतला जात आहे. चीनने एपीआयच्या किंमतीत वाढ केल्याने औषध किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत.
2019 मध्ये 14,400 कोटी एपीआयची आयात
भारतात दरवर्षी सुमारे 39 अब्ज डॉलर्स किंमतीचे औषध तयार करतो. औषध तयार करण्यासाठी आवश्यक स्टार्टिंग मटेरियल, एपीआयसाठी भारत मुख्यत्वे चीनवर अवलंबून आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये भारताने चीनकडून तब्बल 17 हजार 400 कोटी म्हणजेच 2.5 अब्ज डॉलर्सचे एपीआय आयात केले होते.
भारत हा जगातील तिसरा मोठा औषध उत्पादक देश आहे. चीनने एपीआयच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने गंभीर परिस्थीती उद्भवली आहे. डॉक्टर रेड्डी लॅब, ल्युपिन, ग्लेनमार्क फार्मा, मायलन, झाइडस कॅडिला आणी पीफायझर सारख्या भारतातील आघाडीच्या औषध कंपन्या एपीआयसाठी चीनवर अवलंबून आहेत.
चीनकडून दुहेरी हल्ला
वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत फार्मास्युटिकल एक्सपर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष दिनेश दुआ यांनी सांगितले की, गलवान खोऱ्यातील घटनेसंदर्भात चीन दोन प्रकारे हल्ला करत आहे. एकीकडे तो सीमेवर हल्ला करतो आणि दुसरीकडे भारत अवलंबून असल्याचा चुकीचा फायदा उठवू लागला आहे. एपीआयच्या किंमती वाढल्याने औषधांच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत.
पॅरासिटामॉलची किंमत वाढली
पॅरासिटामॉलची किंमत 27 टक्के, Ciprofloxacin ची किंमत 20 टक्के, पेन्सिलीन जी ची किंमत 20 टक्के यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय प्रत्यक प्रकारच्या फार्मा प्रॉडक्टच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.