बिजिंग : वृत्तसंस्था – चीनचे सरकार गलवान खोर्यात मारले गेलेल्या आपल्या सैनिकांवर अंत्य संस्कार करण्यास मनाई करत आहे. इतकेच नव्हे, तर चीनच्या सरकारने गलवान खोर्यात मारले गेलेल्या आपल्या जवानांच्या कुटुंबांना सांगितले की, त्यांनी अंत्य संस्कार करू नयेत, तसेच मृतासाठी कोणताही कार्यक्रम करू नये. असे करून चीन सरकार गलवान खोर्यात झालेली घटना लपवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनमधील गुप्त सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या सूत्रांनुसार चीनच्या सिव्हिल अफेयर्स मिनिस्ट्रीने गलवान खोर्यात मारले गेलेल्या चीनी सैनिकांच्या कुटुंबांना म्हटले की, त्यांनी अंत्य संस्काराची पारंपारिक पद्धत विसरून जावे. मंत्रालयाने पुढे म्हटले की, जर अंत्य संस्कार करायचे असतील तर एखाद्या निर्जनस्थळी जावून करावेत. अंत्य संस्कार पूर्ण केल्यानंतर कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये. मात्र, सरकारने कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याची भिती दाखवून अंत्य संस्कार करण्यास मनाई केली आहे.
बिजिंगमधील सरकारची इच्छा आहे की, चीनच्या लोकांना गलवान खोर्यातील घटना आणि त्यामध्ये मारले गेलेले चीनी सैनिक यांच्याबाबत कमीत कमी लोकांना माहिती व्हावी, कारण यातून चीनची उचापत खोरी संपूर्ण देशाला समजू शकते. चीनला भिती आहे की, जर गलवान खोर्यात मारले गेलेल्या सैनिकांची घटना चीनच्या अंतरराष्ट्रीय सोशल मीडियामध्ये पसरली तर पूर्ण देशात पीपल्स लिब्रेशन आर्मीची थू-थू होईल. यासाठी ते आपल्या जवानांचे अंत्य संस्कारसुद्धा लपवून ठेवायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, चीनच्या लोकांमध्ये गलवान खोर्यातील घटना आता वेगाने पसरली आहे. द गार्डियनने जूनच्या अखेरीस एक रिपोर्ट लिहिला होता, ज्यामध्ये म्हटले होते की, भारतीय जवानांचे बलिदान आणि त्यांच्या अंत्य संस्काराचे व्हिडिओ चीनच्या लोकांकडे सोशल मीडियावरून पोहचत आहेत.
चीनचे लोक भारतीय जवानांचे अंत्य संस्कार पाहून आपसात चर्चा करत आहेत की, चीनच्या सैनिकांचे काय झाले. चीनच्या मारले गेलेल्या सैनिकांना अशाप्रकारचा सन्मान का दिला गेला नाही. यावर चीनच्या सरकारचे उत्तर आहे की, महामारी काळात सरकारने अंत्य संस्काराची पारंपारिक पद्धत रोखली आहे. जेव्हा अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील चीनच्या दुतावातास याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांच्याकडून तात्काळ उत्तर आले नाही. चीनने यापूर्वी सुद्धा आपल्या कारवाया लपवण्यासाठी अशाप्रकारची पावले उचलली आहेत. 2001 मध्ये चीनचे फायटर जेट आणि अमेरिकन हेरगिरी करणारे विमान दक्षिण हैनान बेटावर एकमेकांवर धडकले होते. परंतु, चीनने याबाबत पूर्ण प्रकरण लपवून ठेवले. यापूर्वी 1999 मध्ये बेलग्रेडमध्ये चीनी दुतावासावर जेव्हा अमेरिकेने बॉम्ब टाकले होते, तेव्हा सुद्धा चीनच्या सरकारने आपल्या देशातील लोकांपासून ही गोष्टी लपवून ठेवली होती. जगभरातील एक्सपर्टचे म्हणणे आहे की, चीनची ही अंत्य संस्कारातील लपवा-छपवी हे दर्शवते की, लवकरच चीन अंत्य संस्काराचे नवीन कायदे आणू शकते. बिजिंगमधील सरकारची इच्छा आहे की, गलवान खोर्यातील त्यांच्या कारवायांची माहिती लोकांना समजू नये.