बहुजननामा ऑनलाइन टीम -नवी दिल्ली : लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय लष्कराच्या वार्षिक कॉन्फरन्सला संबोधित करताना म्हटले की, मागील वर्ष खुप आव्हानांनी भरलेले होते आणि त्यांचा सामना करत आपण पुढे गेलो आहोत. आपल्या संबोधनात त्यांनी म्हटले की, भारतासाठी पाकिस्तान आणि चीन मोठा धोका बनले आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी योग्यवेळी योग्य कारवाई केली जाईल. ते म्हणाले, पाकिस्तानकडून सतत दशहवादाला प्रोत्साहन दिले जात आहे, परंतु आम्ही दहशतवादासाठी झीरो-टॉलरन्स ठेवतो.
लष्कर प्रमुखांनी आपल्या संबोधनात म्हटले की, मिझोराममध्ये कोणतीही हिंसा झाली नव्हती, मणिपुरमध्ये हे एक दोन ग्रुप आहेत जे हिंसेत सहभागी होते. तर आसाममध्ये शांतता आहे. अशाप्रकारे नॉर्थ इस्टच्या स्थितीत एक दोन वर्षात सुधारणा झाली आहे.
कोअर कमांडर स्तराच्या 9व्या फेरीतील चर्चेची प्रतिक्षा
लष्करप्रमुखांनी पुढे म्हटले की, आम्ही केवळ लडाखच नव्हे, संपूर्ण एलएसीवर उच्च स्तराची देखरेख केली आहे. सोबतच कोअर कमांडर स्तराच्या आठव्या फेरीची चर्चा झाली आहे, आता 9व्या फेरीची प्रतिक्षा आहे. आम्ही चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची अपेक्षा करतो.
तंत्रज्ञान सक्षम लष्कर विकसित करण्याचे कार्य
लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी सुरुवातीच्या आपल्या संबोधनात म्हटले की, भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञान सक्षम लष्कर विकसित करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला जात आहे. यामध्ये सर्व नवीन तंत्रज्ञान सहभागी करून घेण्यावर फोकस केला जाईल.
तत्पूर्वी लष्करप्रमुखांनी सांगितले की, मागचे वर्ष आव्हानांचे होते. उत्तरी सीमांवर मुख्य आव्हान कोरोना संसर्ग होता. उत्तर सीमांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे आणि शांतता कायम राहण्याची आशा आहे.