बहुजननामा ऑनलाईन टीम – देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून त्याचा सर्वाधिक प्रसार राज्यात झाला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत त्यामुळे लॉकडाऊन होणार का याविषयी प्रशासनाबरोबर सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी राज्यात लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध असणार असणार साेबतच लॉकडाऊन बाबत येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधताना सांगितले आहे. दरम्यान राज्यात लॉकडाऊन करणार नाही मात्र जर सुधारणा झाली नाही तर लॉकडाऊनचा ईशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. जाणून घेऊयात मुख्यमंत्री आज काय बोलले आहेत.
* महाराष्ट्रामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली असून येत्या काही दिवसात आणखी वाढविण्यार भर असणार
* RTPCR चाचण्यांना सर्वाधिक प्राध्यान
* बेड्सची संख्या मोठ्या प्रमाणत वाढवली, देशात सर्वाधिक बेड्स महाराष्ट्र राज्यामध्ये
* महाराष्ट्रात 65 लाख नागरिकांना कोरोनाचे लसीकरण पुर्ण
* लसीकरण देण्यात महाराष्ट्र आघाडीवर
* येत्या एक ते दोन दिवसात पुर्ण निर्णय घेण्यात येणार