नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – आज नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन झाले असून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर मेट्रोच्या एका लाईनवरील रिच-३ लोकमान्य नगर ते सीताबर्डी मार्गावर आजपासून मेट्रो सुरु झाली आहे. दरम्यान ठाकरे यांनी जनतेच्या विकासाची कामे थांबणार नाही आणि नागपूर ही उपराजधानी मागे पडू देणार नाहीत, असे म्हणाले आहेत.
मेट्रो आणि स्टेशनमधील अंतरानुसार महा मेट्रोने प्रवासी दर निश्चित केले असून लोकमान्य नगर ते सीताबर्डी दरम्यान केवळ २० रुपये प्रवासी दर निश्चित केला आहे. तर वासुदेव नगर, सुभाष नगर, इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियर्स, झाँशी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी या सर्व स्टेशन दरम्यान प्रवास करण्यासाठी केवळ २० रुपये दर असून स्टेशनवरून परत येण्यासाठी ३० रुपये दर असणार आहे.
प्रवासी दर संदर्भातील माहिती सर्व स्टेशनवर उपलब्ध राहणार आहे. तसेच ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुकही केले. तर एका गाडीत बसू शकलो नाही पण एकाच स्टेशनवर आलो, असा टोला लगावला आहे. तसेच मुंबई, नागपूरसह राज्यातल्या इतर शहरांचाही विकास करण्याचे आश्वासन देत नागपूर शहर विकासाच्या बाबतीत इतर शहरांच्या मागे पडू देणार नाही. विकासाच्या कामांमध्ये खंड पडू देणार नाही. ब्रॉडगेज प्रस्तावालाही तातडीने मान्यता देऊ, असे त्यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com