मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींचा मोठा वेग आला होता. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने तर काल रात्री एकत्र येऊन आमच्याकडे बहुमताचा आकडा असल्याचे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त यायला सुरुवात झाली होती. अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे बहुमत उरलेले नसल्यामुळे मीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केले.
जनतेने आम्हाला संपूर्ण जनादेश देत सर्वाधिक १०५ जागा दिल्या. आम्ही जनतेच्या मनातील सरकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेने नंबर गेम ओळखला आणि शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून राहिली आणि तुम्ही सोबत येणार नसाल तर आम्ही इतरांच्या सोबत जाऊ अशी शिवसेनेने पहिल्याच दिवशी भूमिका घेतली. नंतर राज्यपालांनी आम्हाला सत्ता स्थापनेसाठी बोलावले परंतु आमच्यकडे बहुमत नसल्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेला नकार दर्शवला. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली आणि इतर तीन पक्षांमध्ये सत्ता स्थापनेबाबत बोलणी सुरु झाली असा संपूर्ण घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितला.
Devendra Fadnavis: After this I'll go to Raj Bhavan and tender my resignation. I wish them all the best whoever will form the govt. But that will be a very unstable govt as there is huge difference of opinions. #Maharashtra pic.twitter.com/Wrhb4PE1rV
— ANI (@ANI) November 26, 2019
मात्र महाराष्ट्रामध्ये किती काळ राष्ट्रपती राजवट राहणार म्हणून अजित पवार यांनी आम्हाला सत्ता स्थापनेसाठी मदत करायचे ठरवले. अशा प्रकारचे पत्र अजित पवार यांनी आम्हाला दिल आणि आम्ही सत्ता स्थापन केली. मात्र त्यानंतर अजित पवारांनी माझ्याकडे येऊन राजीनामा दिला आणि सहाजिकपणे आमच्यकडे बहुमत उरलेले नाही. म्हणून या पत्रकार परिषदेनंतर मी ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इतर तीन पक्षांनी मिळून बनवलेले सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच हे सर्व लोक केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. अशावेळी भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Visit : bahujannama.com