बहुजननामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रने स्टेट बॅंक ऑफ इंडियाप्रमाणे तिचे कर्जाचे दर रेपो रेटशी जोडले आहे. ही बाब बॅंकेच्या ग्राहकांसाठी नवी पर्वणीच असणार आहे. कारण यामुळे ग्राहकांचे ईएमआय़ कमी होणार आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास आरबीआय़ने व्याजदर कमी केल्यास ईएमआय कमी होईल. तर व्याजदरात वाढ केल्यास ईएमआय़ महाग होईल. बॅंक ऑफ महाराष्ट्रने दिलेल्या माहितीनुसार, सणउत्साव पाहता हे नवीन दर येत्या १ सप्टेंबरपासून लागू होतील. सध्या मात्र रेपो रेटशी लिकं असलेल्या नव्या ग्राहकांना रिटेल कर्जाचा लाभ मिळणार आहे.
तसेच, नियमित ग्राहकांसाठीही लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी (ता.२३) जाहीर केले की, बहुतेक बँकाकडून रेपो रेट आणि इतर घटकांशी संबंधित कर्ज उत्पादने देतील. यामुळे गृहनिर्माण, वाहने आणि किरकोळ कर्जाची ईएमआय कमी होईल. गृहकर्जाच्या व्याज दराला आधीच रेपो दराशी जोडले गेले असल्याचे बँकेने म्हटले आहे. तसेच,रिटेल कर्जाच्या व्याज दराला रेपो दराशी जोडल्यास बँका व्याज दराशी संबंधित लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोचवतील. कर्जाचे व्याज दर रेपो दराशी जोडल्यानंतर जेव्हा जेव्हा आरबीआयने रेपो दर बदलेल तेव्हा कर्जाचे व्याज दरही बदलतील.
चौकट
रेपो रेट हा असा दर आहे ज्यावर रिझर्व बॅंक इतर बँकांना कर्ज देते. याच कर्जातून बॅंका ग्राहकांना कर्ज देतात. कमी रेपो रेटचा अर्थ असा आहे की, बँकेकडून कित्येक प्रकारची कर्जे स्वस्त होतील. उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज, इ.