नवी दिल्ली वृत्तसंस्था – भारताच्या चांद्रयान मोहिमेतील अवकाश यान काही वेळापुर्वीच अवकाशात झेपावले. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले. १५ जूलै रोजी तांत्रिक कारणामुळे हे उड्डाण रद्द करण्यात आले होते.
भारताची महत्त्कांक्षी चांद्रयान २ मोहिम इस्त्रोच्या अथक परिश्रमामुळे आज य़शस्वीरित्या उड्डाण करू शकली. १५ जूलै रोजी चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात येणार होते. परंतु ५६ मिनिटे आधी हे उड्डाण तांत्रिक कारणामुळे थांबविण्यात आले. त्यानंतर आज चांद्रयानचे यशस्वी उड्डाण झाले.
चांद्रयान २ यशस्वी झाल्यास भारत जगातला चौथा देश ठरणार आहे. ज्या देशाने चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग केले आहे. चंद्रापासून ३० किमी अंतरावर आल्यानंतर चांद्रयानचा वेग कमी करण्यात येणार आहे. हे यान चंद्रावर उतरण्याआधीची १५ मिनिटे महत्त्वाची आहेत.
सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यावेळी सगळ्यांनीच टाळ्या वाजवून सर्वांनी आनंद साजरा केला. तर चांद्रयानाचा प्रवास ४५ दिवसांपेक्षा जास्त असणार आहे. सुरुवातीचे २३ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच राहली. यावर २५० शास्त्रज्ञांची नजर असणार आहे.
#ISRO #Chandrayaan2
As our journey begins, do you know what is the distance of Moon from Earth? The average distance is 3, 84, 000 km, Vikram lander will land on Moon on the 48th day of the mission, which begins today.
Here’s different view of #GSLVMkIII-M1 pic.twitter.com/4LFEmT2xxZ— ISRO (@isro) July 22, 2019