पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका केली आहे. आम्हाला राष्ट्रवादीची गरज नाही. त्यांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, असे राष्ट्रवादीचे धोरण आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संस्था या ठिकाणी बावनकुळे एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, असे राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्याचमुळे राष्ट्रवादीत कोणीही टिकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीकडे कोणी उमेदवार देखील राहणार नाही. बारामतीत दहशतीचे वातावरण आहे. गेली 40 वर्षे एकाच घरात सत्ता आहे. त्यामुळे तेथील लोक घाबरुन आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे जर का नैतिकता असेल, तर त्यांनी जितेंद्र आव्हाड
(Jitendra Awhad) यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राज्य सरकारने (State Government)
संवेदनशीलतेने आव्हाडांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने त्यांना निलंबित केले पाहिजे.
यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील आरोप केले. महविकास आघाडी सरकारने
(Maha Vikas Aghadi Government) केंद्राच्या योजना लाभार्थ्यांपर्यत पोहचू दिल्या नाहीत.
गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्यासारखा नेता निघून जाणे, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे
(Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) पतन होत असल्याचे चिन्ह आहे.
२०२४ मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत केवळ चार माणसे राहतील.
त्यांना निवडणुकीसाठी उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chandrashekhar Bawankule | ncp will not get candidates in the future criticism of chandrasekhar bawankule baramati pune print news
हे देखील वाचा :
Rajesh Kshirsagar | ‘संजय राऊत आणि विनायक राऊत उद्धव ठाकरेंचे कानफुकरे’
Arbaaz Khan | “सलमानचा भाऊ आणि मलायकाचा…” अनेक वर्षांनंतर अरबाज खानच्या ‘या’ वेदना ओसरल्या