पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी निशाणा साधत सर्वजण असतानाच हे सरकार जाईल असे वक्तव्य केले होते. यावरून मंत्री नवाब मलिक यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते. चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या या वक्तव्यावरून आता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा समाचार घेत. चंद्रकांत पाटलांना स्वप्न पडण्याचा छंद असेल तर त्याला मी काहीच करून शकत नाही अशा शब्दात टोला लगावला आहे.
जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे. मात्र अशी वक्तव्य पाटील हे नेहमीच करत असतात. सर्वजण झोपेत असताना सरकार पडेल अशी भविष्यवाणीही त्यांनी केली होती. यावर त्यांना स्वप्न पडण्याचा छंद असेल, तर त्यावर काय बोलणार असे जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. यावेळी जयंत पाटील हे पुण्यात साखर कारखान्याच्या बैठकीदरम्यानच्या माध्यमाशी बोलत होते.
या दरम्यान, जयंत पाटील पुढे म्हणाले, केंद्रात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहून अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचं कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असे चंद्रकांत पाटील म्हणतात. केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रतही अधिवेशन होणार नसल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.