नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दीड वर्षापुर्वी देशातील बहुतांश भागात सत्ता असलेल्या भाजपा आणि भाजपाच्या नेत्यावर खुर्ची रुसलेली दिसत आहे. केंद्रात पुन्हा सत्ता मिळाली असली तरी विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. काल दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. एकंदरीत सध्या सत्ता आणि खुर्ची भाजपावर नाराज आहे. याचा प्रत्यय आज आला.
आज सोलापूर दौऱ्यावर आलेले चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निर्धाराबाबत माध्यमांना माहिती देत असताना अचानक चंद्रकांत पाटील ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची तुटली आणि चंद्रकांत पाटील खाली पडता पडता वाचले. त्यांनी वेळीत स्वतःला सावरले. सोलापूरमध्ये शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना ही घटना घडली. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती.
त्या दरम्यान पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या विजयाबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरे आनंद व्यक्त करीत आहे. शेजारच्या घरात मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटण्याचा प्रकार सुरु आहे. शिवसेनेने सामनातून आमच्यावर टीका करण्याऐवजी राज्याच एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी. राज्यातील सरकारमध्ये ताळमेळ नाही. त्याचा परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर झाला आहे. रोज महिलांवर कुठे ना कुठे तरी अत्याचार होत आहे.’ अशी देखील टीका त्यांनी केली.