पुणे : बहुजननामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र या भेटीबाबतचा खुलासा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. शरद पवार हे आजारी आहेत. आजारी असतानाही काम करत आहेत. अनेक जण त्यांना भेटून तब्येतीची विचारपूस करत आहेत. फडणवीसही त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते, असे पाटील म्हणाले.
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यानंतर त्यानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमधून भाजपचा संघर्ष संपणार आहे, असा प्रश्न यावेळी पाटील यांना विचारला असता, त्यावर पाटील म्हणाले की, भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही.
भेटीगाठी अनेक कारणांनी सुरु आहेत.
शरद पवार आजारी असल्याने त्यांची चौकशी करण्यासाठी फडणवीस गेले होते, असे पाटील म्हणाले, तसेच फडणवीसांनी रक्षा खडसेंची भेट देखील घेतली.
दुश्मन जरी असला तरी भेट घेण, ही आपली संस्कृती आहे.
संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. जर संवाद नसेल तर अडचण असते.
पण इथे फडणवीस आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे पाटील म्हणाले.
मुंडेंनी कार्यालयातील पक्ष रस्त्यवर आणला
3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. आज सात वर्षे झाली त्या घटनेला. त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी डाक विभाग त्यांच्यावर एक विशेष पोस्ट एनव्हलप प्रकाशित करत आहे. सतत संघर्ष हे गोपीनाथ मुंडेंचं ध्येय होते. कार्यालयातील भाजप पक्ष मुंडेंनी रस्त्यावर आणला. गोपीनाथराव यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले, अशा शब्दांमध्ये पाटील यांनी मुडेंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
कृपया हे देखील वाचा:
मेडिसिन होर्डिंग केसमध्ये गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी, ड्रग कंट्रोलरने HC ला दिला रिपोर्ट
कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर शरीरात कमजोरी असेल तर करा ‘हे’ 7 उपचार; जाणून घ्या
6 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह, माहेरच्यांनी केला घातपाताचा आरोप
शिक्षकांसाठी खुशखबर ! TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय, आयुष्यभर राहणार प्रमाणपत्राची वैधता