बहुजननामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षण असो किंवा मग ओबीसी आरक्षण यावरुन सारख केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्या आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायच झाल तरी हे दिल्लीला सांगतील. तुम्हीच तिथं आधी बघा मग आम्हाला कळवा असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील मंगळवारी (दि.1) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पाटील यांनी यावेळी विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे आरक्षण रद्द होण्याच्या मुद्द्याला राज्य सरकार जबाबदार आहे. गेली दीड वर्ष हे सरकार झोपल होतं हे कोर्टाने दिलेल्या निर्णयातून स्पष्ट होत असल्याचे पाटील म्हणाले.
दरम्यान विरोधी पक्षनेते फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता शिवसेना नेते संजय राऊतांनी पवारांनी फडणवीसांना महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही, असा सल्ला दिला असेल अशी टीका केली. त्याबाबत चंद्रकांतदादांना विचारले असता त्यांनी थेट हातच जोडले. अरे बाबांनो राऊतांबद्दल काही विचारू नका. मी कालच त्यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे त्यांना थोबाडीत लगावतील असे विधान केले होत. त्यातून अजून ते बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सारखसारखं बोलण्याची काही गरज नसल्याचे पाटील म्हणाले.
आरोग्यासह सौंदर्याचीही विशेष काळजी घ्या
उस्मानाबाद पोलिसांनी पकडला तब्बल सव्वा कोटींचा गांजा, चौघे फरार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्घाटन केलेलं लसीकरण केंद्र बंद असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी
संसर्ग नियंत्रित करण्यास नैसर्गिक औषध उपयुक्त; जाणून घ्या
जिमचा ‘प्रभाव’ पाहण्यासाठी तिनं काढले अंतर्वस्त्रात फोटो, ट्रेनरला पाठविल्यानंतर पुढं झालं असं काही…