मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आमच्या सरकारमध्ये कोणीही नाराज नाही. सर्व खूश आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे. जर कोणी नाराज असेल तर त्यांची समजूत काढण्याची व्यवस्था देखील सरकारकडे आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. विरोधी पक्षांकडून सरकारमधील मंत्री आणि आमदार नाराज आहेत, असे महाविकास आघाडीतील नेते बोलत आहेत, त्यावर चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) प्रतिक्रिया दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाविकास आघाडी सरकरच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ग्रामीण भागांसाठी विकासकामे आणि नीधी देण्याची घोषणा केली होती. यावर शिंदे-फडणवीस यांचे नवीन सरकार आल्यानंतर राज्यपालांच्या आदेशानुसार, 1 एप्रिल 2021 नंतरच्या सर्व कामांवर आणि नीधीवर रोख लावण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागांतील कामे थांबली आहेत. सत्ताधारी पक्षातील आणि खासकरुन शिंदे यांच्या गटातील आमदार या निर्णयावर नाराज असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हंटले होते.
चंद्रकांत पाटील पुणे जिल्ह्यातील सरकारी कामांचा आणि कार्यालयांचा आढावा घेत आहेत. यावेळी त्यांनी माध्यामांसोबत संवाद साधत कोणीही नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवार आणि जयंत पाटील यांनी हे सरकार अडीच वर्षे राहणार नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे मी त्यांना सांगेन की आमच्या सरकारमध्ये कोणीही नाराज नाही, असे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात त्यांना 10 अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला होता.
त्यांना अद्याप खाती मिळाली नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पाटील म्हणाले, कोणीही नाराज नाही.
सर्व काही उत्तम सुरु आहे.
अजित पवार, जयंत पाटील आणि नाना पटोले हे या सरकारच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सरकार पडणार
आणि आमदार नाराज आहेत, असे बोलत आहेत.
तसे काही देखील नसल्याचे पाटील म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chandrakant Patil | No one is upset in the government, if someone is upset, the government has a system to make them understand – Chandrakant Patil
हे देखील वाचा :
Women Asia Cup 2022 | आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने केला ‘हा’ पराक्रम