पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Chandrakant Patil | राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात अनेक कारणावरुन शीतयुद्ध पाहायला मिळतं. भाजपातील नेते अनेकवेळा महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं भाष्य केलं. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दुसऱ्यांदा सरकारबाबत वक्तव्य केलं आहे. ”आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एका पाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांना निवेदन सादर केल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ”महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. 2 मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील.”
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ”पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि एकूण संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा सत्कार करून काल पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी त्यांना अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडून यादी मिळत होती असं सांगितलं तर देशमुख म्हणतात की, त्यांना अनिल परब (Anil Parab) यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते. तर, दुसरीकडे परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी म्हटले की, वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दबाव आणला होता. या गंभीर आरोपानंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. देशमुख यांच्या प्रकरणात न्यायालयाने CBI चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल, असं पाटील म्हणाले.
Web Title :- Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil said after this date thackeray government will down to power
CM Uddhav Thackeray | ‘थप्पड से डर नही लगता प्यार से लगता है’; CM उद्धव ठाकरेंची चौफेर टोलेबाजी