नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये असलेल्या शिखांचे पवित्रस्थान असणाऱ्या गुरुद्वारा ननकाना साहिबावर झालेल्या हल्ल्यानंतर देशात त्याचा निषेध होत आहे. शीख समाज सोडून इतरही समाजातील लोकं या निषेधामध्ये सहभागी आहेत. तसेच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अनेकजण आपला निषेध नोंदवत आहेत. ननकाना साहिबवरील दगडफेकीच्या घटनेनंतर अनेक यूजर्सने काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनाही ट्रोल केले आहे.
काँग्रेस अजूनही यावर गप्प आहे, असे भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी म्हणाल्या. तसेच सिद्धू पाजी कुठे पळून गेले हे मला माहित नाही. एवढं सर्व करूनही त्यांना जर आयएसआयच्या प्रमुखांना मिठी मारायची असेल, तर त्यात कांग्रेसने लक्ष घातले पाहिजे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि शिरोमणी अकाली दलाने घडलेल्या घटनेवर चिंता व्यक्त केली असून नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. ‘तू गप्प आहेस. आता तुम्ही गप्प आहात. तुमचे मित्र इम्रान खान यांच्यावरही तुम्ही आता काही मत व्यक्त करणार नाही काय?’ असे प्रश्न करत युजर्सने नवज्योत यांना ट्रोल केले आहे.
मुनाक्षी लेखी पुढे म्हणाल्या की, तुम्ही आयएसआय चीफला मिठी मारणार आणि ते तुम्हाला भाऊ मानतील, असे नाही. तो कसाई असेल तर कसाईच राहील, आपला शिखांचा जो इतिहास आहे तो गौरवमयी राहिला आहे. ननकाना साहिबवरील ही घटना घृणास्पद आहे. या घटना १९४७ पासून घडत असून आज सोशल मीडियामुळे या घटना समोर येत आहेत. पंजाबचे माजी मुयख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनीही घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देत ही अत्यंत दुःखद घटना आहे, असे म्हटले आहे. तसेच तिथे राहणाऱ्या शिखांची सुरक्षा लवकरात लवकर करून शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन त्यांनी भारत सरकारला केले.