अमृतसर : वृत्त संस्था – जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेला गुरदासपुरचा सुपुत्र रंजीत सिंह सलारिया यांना लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो लोकांचे डोळे अश्रूंनी भरले होते. रंजीत सिंह 13 जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले. 12 हजार फुट उंचीवर आणि -30 डिग्री तापमानात रंजीत गस्त घालत होते. तेव्हा हिमस्खलनात ते सापडले. रंजीत सिंह भारतीय लष्कराच्या 45 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते.
शहीद झाल्यानंतर चार दिवसांनी रंजीत यांचे पार्थिव शरीर गुरुवारी संध्याकाळी श्रीनगरहून विशेष विमानाने अमृतसरच्या राजासांसी एयरपोर्टवर आणण्यात आले. येथील लष्कराच्या जवानांनी लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव तिब्बड़ी कँटमध्ये नेले. शुक्रवारी सकाळी शहीद जवानाचे पार्थिव शरीर त्यांचे गाव सिद्धपुरमध्ये आणण्यात आले. जॅक रायफल्सच्या जवानांनी शहीदाला येथे सलामी दिली.
पत्नी दीया म्हणाली, माझ्या रंजीतला शवपेटीतून काढा, त्याचा श्वास कोंडतोय
तिरंग्यात लपेटलेले शहीद जवानाचे पार्थिव जेव्हा गावात आले तेव्हा वातावरण दु:खाने भरून गेले. आई रीना देवी, वडील हरबंस सिंह, पत्नी दीया व बहीण जीवन ज्योति यांच्या ओरडण्याने उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. पत्नी दीयाने शहीद पतीची शवपेटी बघताच तिला भावना अनावर झाल्या. रडताना तिच्या मुखातून शब्द निघाले, माझ्या रंजीतला शवपेटीतून बाहेर काढा, त्याचा श्वास कोंडतोय. माझ्या परीला तिच्या वडीलांना बघायचे आहे, बघ परी तुझे पापा आले आहेत. एवढे बोलून ती बेशुद्ध पडली.
आई आणि बहिणीने दिला खांदा
शहीद जवान रंजीत सलारिया यांची आई रिना आणि बहिण जीवन ज्योती यांची मागील चार दिवसांपासून शुद्ध हरपली होती. जेव्हा लष्कराचे जवान तिरंग्यात लपेटलेले शहीदाचे पार्थिव शरीर स्मशानात घेऊन निघाले तेव्हा आई आणि बहिणीने शहीदाला खांदा दिला. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळयांतून अश्रू येत होते. शहीद रंजीत सलारिया त्यांच्या गोड स्वाभावामुळे संपूर्ण गावाचे लाडके होते, जेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानात निघाले तेव्हा गावातील युवकांनी शहीदाच्या स्मरणार्थ रस्त्यांवर फुले पसरवली होती.
शहीद जवान रंजीत सलारिया यांनी ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या आपल्या मुलीच्या जन्मानंतर मोठा आनंद साजरा केला होता. आणि प्रेमाने तिचे नाव परी ठेवले होते. जेव्हा छोट्या परीने आजोबा हरबंस सिंह व काका सुरजीत सिंह यांच्यासोबत आपल्या चिमुकल्या हातांनी आपल्या शहीद वडीलांच्या चितेला मुखाग्नी दिला तेव्हा सारा परिसर शहीद रंजीत सलारिया अमर रहे, भारत माता की जय च्या जयघोषाने दणाणून गेला.
डीसी विपुल उज्ज्वल यांनी लष्करी अधिकार्यांसोबत शहीदाच्या कुटुंबियांना तिरंगा भेट देताना म्हटले की, जवान रंजीतने देशासाठी बलिदान दिल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला आहे, त्यांच्या बलिदानाची भरपाई होऊ शकत नाही, पण तरीही सरकार त्यांच्या पत्नीला त्यांच्या शिक्षणानुसार योग्य नोकरी देईल.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा