मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सर्वच राज्यात पोलिसांची स्थिती वाईट आहे. दिल्लीतील पोलिसांच्या आंदोलनाला केंद्र सरकार जबाबदार आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. पोलिसांना आठवड्याची सुट्टीही मिळत नाही असंही पवार म्हणाले. दिल्लीत वकिलांनी पोलिसाला वर्दीत असताना मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल झाला होता. यावर पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “राज्यात पोलिसांची स्थिती खूपच वाईट आहे. एका पोलिसाला रस्त्यात आणि तेही वर्दीत असताना मारहाण होते ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलीस जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांना रविवारची सुट्टीही मिळत नाही. दिल्लीत पोलिसांचे जे आंदोलन सुरू आहे त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे” असंही पवारांनी म्हटलं आहे. याशिवाय पवारांनी शेतकरी आणि अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.
Visit : Policenama.com
- भिजवलेले बदाम नियमित सेवन केल्यास होतील ‘हे’ 4 आरोग्यदायी फायदे
- लग्न करण्याचेही ‘हे’ 5 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- वार्धक्याच्या खुणा झाकण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर, जाणून घ्या
- नितळ आणि सुंदर त्वचेसाठी अशी घ्या काळजी, जाणून घ्या उपाय
- नेहमी ताजेतवाने, उत्साहित राहण्यासाठी ‘या’ 9 गोष्टींची काळजी घ्या
- निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त ‘एवढं’ करा, जाणून घ्या
- मिठ जास्त खाल्ल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ घातक परिणाम, जाणून घ्या