नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Central Government | कोरोना महामारीमुळे नोकरी गमावणार्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी म्हटले की, ज्या लोकांनी या महामारी दरम्यान आपली नोकरी गमावली आहे, त्या सर्वांच्या ईपीएफओ (EPFO) अकाऊंटमध्ये सरकार 2022 पर्यंत पीएफ (PF) चे अंशदान जमा करणार आहे. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की, ज्या लोकांचे ईपीएफओमध्ये रजिस्ट्रेशन असेल, त्याच लोकांना या सुविधेचा (Central Government) लाभ मिळेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मनरेगाचे बजेट वाढून 1 लाख कोटी
त्यांनी म्हटले कोरोनामुळे रोजगारावर आलेले संकट पाहता या वर्षाचे मनरेगाचे बजेट 60 हजार कोटी रुपयांवरून वाढवून एक लाख कोटी रुपये केले आहे.
युनिट्सचे ईपीएफओमध्ये रजिस्ट्रेशन आवश्यक
अर्थमंत्र्यांनी म्हटले की, केंद्र सरकार त्या लोकांसाठी 2022 पर्यंत कंपनीसह कर्मचार्याच्या पीएफच्या वाट्याचे पैसे भरेल, ज्यांनी नोकरी गमावली आहे.
परंतु त्यांना औपचारिक क्षेत्रात छोट्या प्रमाणात नोकरीत काम करण्यासाठी पुन्हा बोलावले,
अशा युनिट्सचे ईपीएफओमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा ही सुविधा दिली जाईल.
MSME ला जे स्थान दशकांत मिळाले नाही ते आम्ही देतोय
अर्थमंत्री म्हणाल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना
(एमएसएमई) दशकांपर्यंत जे स्थान मिळाले नाही ते केंद्रातील सध्याचे मोदी सरकार देत आहे.
पुढे सुद्धा ते आणखी चांगले केले जाईल.
मागील दोन वर्षात केंद्र सरकारने खुप वेगळ्या गोष्टी केल्या आहेत.
सरकारने एमएसएमईची व्याख्या खुप लवचिक प्रकारे बदलली.
संसदेत एक विधेयक आणले आहे ज्यांचा थेट फायदा एमएसएमई क्षेत्राला होईल.
Web Title : Central Government | big decision of the central government those who lost their jobs will get pf by 2022 know everything
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | पोलिसांची नजर चुकवून आरोपीचे पलायन, खराडी मुंढवा बायपास रोडवरील घटना
Raosaheb Danve | ‘गोपीनाथ मुंडे साहेब नसते तर गावच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो’