बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांवर जास्त भर देण्याचे आवाहन लोकांना केले होते. मोदींच्या या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली. त्यानुसार आता सर्व केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जाणार आहे.
हा निर्णय 1 जूनपासून अंमलात आणला जाणार आहे. त्यानुसार 10 लाख केंद्रीय अर्धसैनिक दलातील सुमारे 50 लाख कुटुंबे 2 हजार 800 कोटी रुपयांची देशी उत्पादने खरेदी करतील.
पंतप्रधानांनी देशाला आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अमित शाह यांनी ट्वीट करुन केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. अशी घोषणा केली. यामुळे जवळजवळ 50 लाख कुटुंब स्वदेशी वस्तुंचा वापर करणार आहेत. देशातील बनवलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करुन इतरांनीही तसे करण्यास प्रोत्साहित करावे . प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे वचन दिले तर पाच वर्षांत देशातील लोकशाही स्वयंपूर्ण होऊ शकते. असा दावा शाह यांनी केला आहे.