नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची जगभरात दहशत असून त्यामुळे आतापर्यंत ३ हजार लोकंबीचा मृत्यू झाला असताना आता काही देशांची आर्थिक परिस्थितीही धोक्यात आली आहे. भारतात अनेक उत्पादकांना महाग करण्यात कोरोनाचा हात आहे. पण कोरोनामुळे मागणी कमी झाली असून काही वस्तू स्वस्तही झाल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे अनेक वस्तू महाग झाल्याची खबर येत आहे. पण आता या व्हायरसमुळे अनके देशांना सप्लाय केल्या जाणाऱ्या वस्तूंची निर्यात थांबवली आहे. मागणी कमी होऊन पुरवठा वाढल्यामुळे त्यांची किंमत कमी नोंदवली जात आहे.या सामानांमध्ये खाण्या-पिण्याच्या गोष्टींसह इतर अनके गोष्टींचा समावेश आहे. इतकेच नाही तर फिरण्यासाठीही लोकांना कमी खर्च करावा लागत आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला असून याचा परिणाम म्हणून भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.१२ जानेवारीला कोरोना व्हायरस पसरल्याची खबर सार्वजनिक करण्यात आली होती. यानंतर ३ मार्चपर्यंत पेट्रोलची किंमत ४ रु. ४६ पैसे प्रति लिटर कमी झाली आहे. तर डिझेलची किंमत ५ रु. ८ पैसे कमी झाली आहे. म्हणजेच मागील दोन महिन्यांत वाहन चालविणे पूर्वीपेक्षा स्वस्त झाले असून कोरोना विषाणूचा परिणाम नियंत्रित न केल्यास किंमती आणखी खाली येऊ शकतात. परंतु अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे ही घसरण होईल, ही कोणत्याही अर्थाने चांगली बातमी नाही.
यासह, कोरोनाच्या संकटाने पर्यटन करणाऱ्या लोकांसाठी टूर पॅकेजची किंमत कमी केल्याची बातमी असून अहवालानुसार कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन ३० टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय खाद्य तेलाच्या किंमतीही १० टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. भारताच्या वार्षिक खप २३५ लाख टनपैकी ७० टक्के आयात केली जाते. यापूर्वी सोयाबीन, कापूस आणि बासमतीच्या किंमतीही दहा टक्क्यांनी खाली आल्या आहेत. यासाठीही कोरोना विषाणूला जबाबदार धरले जात आहे.