मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा पोलिसांनी केला आहे. हैदराबाद एन्काऊंटरने संपूर्ण देश ढवळून निघाला असून अनेक क्षेत्रातील जेष्ठ लोकांनी आणि राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. याचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. अनेक खासदारांनी लोकसभेत आपापली मतं मांडली आहेत.
Arvind Sawant,Shiv Sena, in Lok Sabha:A law needs to be constituted through which such(crimes against women) cases are heard directly in Supreme Court,currently procedure starts from lower courts,process goes on&on.I appeal to you(Speaker)to set up a committee to discuss this pic.twitter.com/RTsgvnakNI
— ANI (@ANI) December 6, 2019
त्यावेळी शिवसेना खासदार सावंत म्हणाले की, “महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांचे खटले हे थेट सुप्रीम कोर्टात चालवले जावेत यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. सध्याची कायदेशीर प्रक्रिया ही खूपच संथ असून कनिष्ठ न्यायालयापासून सुरु होऊन ती पुढे सुरुच राहते. त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळण्यास उशीर होतो. म्हणून माझे लोकसभा अध्यक्षांना आवाहन आहे की त्यांनी असे गुन्हे थेट सुप्रीम कोर्टात चालवण्याबाबत चर्चेसाठी एक समिती नेमावी.”
Visit : bahujannama.com