लखनऊ : वृत्तसंस्था – भारतील लष्करातील जातीच्या नावावर रेजिमेंटस आहेत. जाट, रजपुत, गोरखा, शीख, डोंगरा, पंजाब, बिहार, आसाम या रेजीमेंटसचाही यात समावेश आहे. परंतु अशा प्रकारे जातींच्या नावाने असलेल्या रेजीमेंट्स रद्द करण्याची मागणी एका दलित नेत्याने पंतप्रधान मोदीना पत्र लिहून केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते आणि दलित नेते ओ. पी. धामा यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे. ओ. पी. धामा हे डॉ. बी. आर. आंबेडकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत.
लष्करात अहिर रेजीमेंट असावी अशी मागणी गेल्या काही दिवसांत केली जात होती. अशाच प्रकारे बाकीच्या काही संस्थाही मागणी करू शकतात. परंतु हे देशहिताच नाही. असं धामा यांनी पत्रात म्हटले आहे.
मागील काही दिवसांपुर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अहिर बख्तरबंद रेजिमेंट करण्याचं आश्वासन दिलं होतं. तर भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांनी चांभार रेजीमेंट काढण्याची मागणी केली होती. चांभार रेजिमेंटचा मुद्दा राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगासमोर आहे.
शहिदांचे नाव देण्याची मागणी
देशात जातींचे उच्चाटन करण्यासाठी शहिदांच्या नावाने रेजिमेंट बनवाव्यात. अशी मागणी त्यांनी केली. लष्करासोबत हवाई दल आणि नौदलात अशा रेजीमेंट्स नाहीत. परंतु लष्करात अशा २३ रेजीमेंट्स आहेत. त्यातल्या बहुतांश रेजीमेंट्स या जातीच्या आधारावर आहेत. त्यामुळेच या रेजीमेंट रद्द कराव्यात अशी मागणी ओ. पी. धामा यांनी केली आहे.